Thursday, December 29, 2011

सारिका

सारिका (एक व्यक्तिचित्र...)



तिच्या गालावरची खळी
जणू गुलाबाची उमलू पाहणारी नाजूक कळी

तिच्या हाताचा तो नाजूक कोमल स्पर्श
अंगावर रोमांच फुलवणारा मोरपिसाचा अर्क

तिचे ते मनमुराद हसणे
जणू शरदाचे चांदणे

तिचे ते सुंदर लाजणे                          (  तिचे लाजणे जणू 
जणू लाजाळूचे स्वतात सामावणे          मोहरलेली स्पंदने )

तिचा तो गोड मधुर आवाज
जणू कोकिळेचा (सारिकाचा दुसरा अर्थ) आलाप

तिचे  ते  नाजूक  रेखीव  पाणीदार डोळे
जणू  निरागसता आणी निष्पाप मनाचे प्रतीक

तिचे ते दिलखुलास हसणे
जणू मनाला स्वप्नांच्या नगरीत नेणे

तिची प्रत्येक अदा मनाला वेड लावून जाते
मनाच्या  एका  कोपऱ्यात  प्रत्येक गोष्ट घर करून बसते.



Thursday, December 22, 2011

प्रेम आणि जोडीदार

प्रेम आणि जोडीदार ...  

आ यु ष्य च्या काही क्षणी आपल्याला कोणीतरी आवडत फार आवडत. तिचा सहवास हवाहवासा वाटतो. तिचेच विचार मनात येत राहतात (दिवस रात्र )
हळू हळू आपले मनही तिच्यात गुंतत जाते मग हीच भावना बळावते आणि तिच्याशीवाय जगणे अशक्य प्राय आहे असे विचार मनात डोकाऊ लागतात.

सारे सारे नैसर्गिक.... कोणीतरी   आवडणे,  आपण तिच्या  प्रेमात पडणे आणि पुढचे सगळेच ....
यात आपला दोष नसतोच तर तो तारुण्याचा आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा प्रताप असतो

त्या वयात कोणीतरी आवडणे , तिचे  आचार विचार , तिची  style , तिची निरागसता, साधेपणा , तिचे हसणे, रागावणे, लाजणे, केवळ तिचे असणे हि आपल्याला वेंड लावून जाते आणि आपण एक वेगळ्या भाव विश्वात रममाण होतो....या साऱ्याची व्यवस्था निसर्गाने आधीपासूनच  करून ठेवलेली असते... आपण फक्त एका प्याद्या सारखे ते सारे FOLLOW करत असतो पण तिच्या शीवाय जगणेच शक्य नाही हा पूर्णपणे आपल्या मनाचा खेळ असतो ( पण "ती" आपल्या आयुष्यआत  आली तर जीवन अधिक सुखकर आणि आनंदमय नक्कीच होते)

पहिल्यांदा असे घडताना ही Feeling येणे स्वाभाविक आहे ,  त्या काळात प्रेम करायची भावना निर्माण झालेली असते, आपले मन स्वप्नाळू आणि अपरिपक्व असते काळ फार कमी असतो ... पण जस जसे आपण  स्वप्नातून सत्यात यायला लागतो तेव्हा स्वप्नातले निर्णय  चुकीचे वाटू लागतात मन दुखी होऊ लागते त्याची फरफट होऊ लागते .... स्वप्ने तुटल्यावर सारेच स्पष्ट होते

अश्या मनाला काबूत कसे आणवे त्याची कशी समजूत घालावी असे अनेक विचार आणि प्रश्न मनी येतात आणि इथेच मन परिपक्व व्हायला सुरवात होते असे आपण म्हणू शकतो rather  मला वाटते  (प्रत्येकाच्या बाबतीत असे घडते असे नाही ... काहींना लवकर अक्कल  येते काही त्यातून बाहेरच येत नाहीत  आणि माझ्या सारखे काही पुन्हा प्रेमात पडतात :-p)

तारुण्याच्या भरात पटकन आवडून गेलेल्या  व्यक्तीला  आ यु ष्य ची जोडीदार करण्याची घाई मुळीच करायला  नको
तिच्या  सवयी ,  स्वभाव , समजुद्दारपणा तिचे आपल्यावर असलेले प्रेम या गोष्टी खूपच Important  असतात
तिच्या सवयी खूप मोठा आणि important  भाग आहेत , त्या सवयी मुळेच आपण एकमेकांबरोबर कसे राहू हे समजते. जर सवयी MATCH होणाऱ्या असतील तर well n Good , पण जर त्यात खूप तफावत असेल तर मात्र प्रोब्लेम्स होतात. तेव्हा तिचा स्वभाव आणि समजुद्दारपणा कामी येतो.

जीवनाचा साथीदार निवडताना.आवडून गेलेल्या  प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आपण समजतो तसाच असेल याची काही शाश्वती नसते (आपण आपल्या मनाला तसे समजावत असतो) , ती समजुद्दार आहे की नाही , तिचा स्वभाव कसा आहे ते आपल्याला तिच्या सहवासात (तिच्याशी वेगवेगळ्या गोष्टीबद्दल बोलल्यावर , तिचे विचार जाणून घेतल्यावर, तिची आवड नावड समजून घेतल्यावर , तिच्या अपेक्षा , इच्छा आपल्या बनवण्यावर ......जर तिची आणि आपली स्वप्ने मिळतीजुळती असतील तर तो एक + point असतो,  म्हणूनच  मला वाटते की एक चांगली मैत्रीनच चांगली  सहचारणी बनू शकते :-) ) राहिल्यावरच कळणार. ( नेमकी चूक इथेच होते माणसे प्रेम करून बसतात आणि आपल्या जोडीदार असाच आहे असे तर्क लावून बसतात, काही काळ सुखाचा जातो पण जेव्हा एकमेकांना समजून घेण्याची  वेळ येते तेव्हा Problems  होऊ लागतात आणि सगळेच मोडकळीस येते)

प्रेम हे  त्या नात्याची सुरुवात आहे , त्या व्यक्तीचा स्वभाव,सवयी त्या ही पेक्षा महत्वाच्या  आहेत , त्या वर भरपूर काही अवलंबून असते आणि  समजुद्दारपणाशिवाय त्या नात्यालाच अर्थ नाही.(त्याला नात्याचा पाया म्हणता येईल )

ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता तिच्या आठवणी आपल्या ह्रृदयात जपुन ठेवा. तुमच्या कृतीतुन तिला तुमच्या प्रेमाची जाणीव करुन द्या. तुम्हाला कदाचीत कळणारही नाही.. but the other person will feel it when you do kind things to show your care. Love is the most unselfish emotion we should posess!!.


एकदा कुठेतरी वाचनात आले होते .. “Your parents will always love you more then you will love them and you in turn will love your children more then they will love you. the reason being that deep love emanates from knowledge”
लेखक म्हणतो.. “डोळे बंद करा आणी कोणत्याही १० गोष्टींचा विचार करा. तुम्हाला डोळ्यासमोर ज्या ज्या १० वस्तु, व्यक्ती दिसतील त्यावर तुम्ही मनापासुन प्रेम करता.” (मला तर १० पैकी ५ वेळा तीच दिसते :-p)
तुम्हाला प्रेम अनुभवायचे असेल, तर आधी प्रेम करायला शिका, दुसऱ्याला द्यायला शिका. Giving IS LOVE.

मग बघाल न प्रेम करून ???

पाहताक्षणी एखादी व्यक्ति आवडणं हे " आकर्षण" असतं ,

परत पहावसं वाटणं हा " मोह " असतो ,

त्या व्यक्तिच्या जवळून जाण्याची इच्छा असणं ही ..." ओढ " असते ,

त्या व्यक्तिला जवळून जाणणं हा " अनुभव "असतो आणी त्या व्यक्तिला तिच्या गुणदोषांसह

स्विकारणं हेच खरं " प्रेम " असतं ..!!!





 ( Note: Block Letters  मधल्या ओळी  पुस्तकातल्या  आहेत )


 

Monday, December 19, 2011

शिकवण

आजही  त्याने ते केलेच ... गोष्ठ छोटीशीच...  अगदीच  लहान पण प्रत्येक वेळी मनाला सुखावून जाणारी ...
माझ्याबाब्तीतल्या इतक्या लहान लहान गोष्टी तो लक्षात ठेवतो आणि न विसरता शुभेछा पाठवतो.

कॉलेज मध्ये खेळात गोल्ड मेडल मिळाले
ऑफिस  मध्ये १ वर्ष पूर्ण  झाले
माझे प्रमोशन  झाले
सुट्टी एन्जोय करायला सांगून आल्यावर तेथील अनुभव विचारणे
माझी तब्बेत ठीक नसताना मी कशी आहे ते विचारायला call करणे.
काही नवीन केल्यास त्याबद्दल शाबासकी देऊन अजून encourage करणे
माझ्या बर्थडे ला न चुकता call करणे
विचारले नसतानाही योग्य सल्ले देणे  ( :-p :-p :-p )

अशा एक न अनेक ज्या कधी कधी मलाच लक्षात नसलेल्या लहान गोष्टी तो माझ्या  लक्षात आणून देतो. मीही त्या गोष्टी बद्दल मग थोडा विचार करू लागते.
खरच काय मिळत असेल त्याला हे करून , काही मिळण्या साठी  का तो हे करत असेल? , फक्त   माझ्या साठीच करत असेल की सगळ्यांसाठी?.

reply  केला नाही तरी त्या बद्दल एक शब्द न उच्चारता राग न आणता पुन्हा मला लहान सहान  गोष्टींची आठवण  करून  देतो.
का कुणास ठावूक तो दिवस इतका imp नसला तरी आजकाल त्याच्या शुभेच्छांमुळे त्या दिवसाला एक वेगळेच रूप प्राप्त होते.

आयुष्य तील प्रत्येक लहान गोष्टीत मोठा आनंद लपला आहे तोच आनंद  मला अनुभवायला तर तो सुचवत नसेल ना.

धकाधकीच्या जीवनात खूपच कमी गोष्टी लक्षात राहतात, कधी विचार केलाय की प्रथम  ती गोष्ट करताना आपण किती आनंदी होतो ते?, त्या वेळी किती चांगले विचार मनात तरळले होते ते? , तो क्षण आपण कसा अनुभवला होता ते?.  त्या वेळी जे काही केलेले आणि अनुभवलेले ते आता आटवले जरी तरी आपण त्या विश्वात रमून जातो, एक दोन घटका का होईनात आपण तो आनंद पुन्हा अनुभवतो. आनंद अनुभवण्यात कोणी मागे का म्हणून राहावे?

न राहवून मी त्याला विचारलेच...
म्हणतो की माझ्या आजोबांनी ३ गोष्टी सांगितलेल्या त्याच Follow करण्याचा प्रयत्न करतोय... :-)

१. "सुख एकट्याने खाऊ नकोस सर्वांना वाट आणि दुख एकट्याला खाऊ देऊ नकोस."

२. दुस्रांच्या सुखात स्वताचे सुख मानायला शिक, दुस्रांना त्यांच्या आन्दाच्या क्षणी शुभेचा दे तो क्षण त्याच्या साठी एक आठवण बनवण्याचा प्रयत्न कर.
कुणी तुझ्या साठी असे करेल याची मात्र अपेक्षा ठेऊ नकोस आपले काम करत रहा.
( का करत असेल हा ? त्याच्या मनात काय आहे?  असे अनेक प्रश्न त्यांना पडतील ........
 कुणी चांगुलपणा दाखवला तर आपल्याला त्याचा संशय जास्त  येतो हे वास्तव आहे (मीही त्याला अपवाद नाही :-p ) )
आपण दुसऱ्यासाठी काही चांगले करतोय ही प्रोसेस enjoy कर तुलाच किती मस्त वाटेल ते बघ.( ही ओळ पुस्तकातली आहे)

३. लोकांच्या मनात झाक , त्यांना काय हवे आहे ते ओळखायला शिक , वेळ लागेल त्यासाठी पण प्रयत्न केलेस तर काहीच अवघड नाही. काही लोक उलगडतील काही नाही पण प्रयत्न थांबवू  नकोस.
 प्रयत्न  केलास याचेच समाधान मान.
दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याकडे काय 'बेस्ट' आहे ते आपण ओळखायचं. आणि आपल्याकडे असलेल्या त्या 'बेस्ट' गोष्टीची कोणाला गरज आहे ते शोधत राहायचं !

त्याचे विचार ऐकून मनातल्या शंका पण दूर झाल्या आणि जीवन जगण्यासाठी एक नवी दिशाही  सापडली.


वरील तीन गोष्टी समजण्यासाठी खाली त्याचे Brief  Explanation.
कोणी लिहिलंय ते माहीत नाही पण छोट्याश्या Paragraph मध्ये खूप मोठा  अर्थ  सांगून गेलय...

Extending simple human kindness to other people can make a huge difference in their lives and in yours. Everyone on Earth is carrying some sort of burden. You can't make their pain, stress, or grief just magically disappear but you can make others feel just a little bit lighter and happier on their journey, even if only for five seconds. When you make friendliness a habit, you'll attract kindness and smiles in return, and you'll feel great about yourself for making a positive difference in the world!


Note:  वरील स्टोरी काल्पनिक आहे.