तिला लिहिलेली न दिलेली पत्रे ।।।
१
ही पत्रे मी प्रवीण कुलकर्णी (सकाळ दैनिकात लेखन करणारे ) यांनि लिहिलेल्या काही पत्रांतून प्रेरणा घेऊन लिहिण्याचा प्रयत्ने करत आहे . काही ओळी त्यांनी लिहिलेल्या पत्रांतून वापरल्या आहेत .
प्रिय ,
पत्र लिहावे असे खूप दिवसांपासून मनात होते , पण धाडसच होत नव्हते .अगदी खरे सांगायचे झाल्यास मनात एक प्रकारची भीती होती , काय वाटेल आणि .... पण आता तुला हि पत्रे द्यायचीच नाहीत म्हणून सुरवात करतोये .
प्रिय ,
खरेतर पहिल्याच पत्रात "प्रिय " लिहिताना हाथ अडखळ् तोये , तरी तुला हृदयात दिलेल्या स्थानामुळे "प्रिय " लिहायला धजावतोय . बघावयास गेले तर "प्रति " पासून "प्रिय " पर्यंतचा प्रवास मोठाच .माझ्या अधिरतेने म्हण किव्वा दुसर्या कुटल्या कारणाने म्हण इतका प्रवास माझ्या अधीर मनाने होणे शक्य नाही .
नाही तरी हा "प्रिय " तुझा कुठे आहे . तो तर माझा आहे फक्थ माझा . तुलाही मी प्रिय वाटलो पाहिजे हा काही आग्रह नाही ( अपेक्षा मात्र आहे ) . पत्रास कारण कि , ...... खरच काही कारण असावे का असे पत्र लिहावयास ? तसे म्हटले तर कारण एकाच तुझ्या बद्दल काय वाटते याला वाट करून देणे , मनातच साठवून ठेवलं तर आठवण बनून त्रास होऊ लागतो त्यांचा ...
ज्या वेळी तुला पाहिले तेव्हापासूनच तुला जाणून घायची इच्छा मनी बळावत गेली।त्या क्षणा पासूनच हृदय तुला स्वाधीन केलेय , एव्हाना तुला याची कल्पना आली असेलच .तू समोर असताना तुझ्याकडे एकटक पाहण्याशिवाय दुसरा पर्याय माझ्याकडे उरतच नाही , हा एकटक माझ्या कडे पाहणारा वेडा कोण? असा प्रश्न नक्कीच तुला पडला असणार .... नाही का?
तुझ्या मनात काय आहे हे मला माहित नाही , तुझ्या आ यु श्या त कोणी आहे कि नाही याचा मला थांग पत्ता ही नाही, पण तू मला आवडतेस यात दुमत नाही .
पत्र थोडं लांबलय , काय करू पहिलाच प्रयत्न होता . काय लिहू नि काय नको हेच समाजात नव्हते , पुढेही पत्र लिहायची आहेतच की ( फक्थ तुला हि पत्रे मिळणार नाहीत याची काळजी घेत लिहिणार आहे )...
पुन्हा भेटूच .....
तुझाच ,
१
ही पत्रे मी प्रवीण कुलकर्णी (सकाळ दैनिकात लेखन करणारे ) यांनि लिहिलेल्या काही पत्रांतून प्रेरणा घेऊन लिहिण्याचा प्रयत्ने करत आहे . काही ओळी त्यांनी लिहिलेल्या पत्रांतून वापरल्या आहेत .
प्रिय ,
पत्र लिहावे असे खूप दिवसांपासून मनात होते , पण धाडसच होत नव्हते .अगदी खरे सांगायचे झाल्यास मनात एक प्रकारची भीती होती , काय वाटेल आणि .... पण आता तुला हि पत्रे द्यायचीच नाहीत म्हणून सुरवात करतोये .
प्रिय ,
खरेतर पहिल्याच पत्रात "प्रिय " लिहिताना हाथ अडखळ् तोये , तरी तुला हृदयात दिलेल्या स्थानामुळे "प्रिय " लिहायला धजावतोय . बघावयास गेले तर "प्रति " पासून "प्रिय " पर्यंतचा प्रवास मोठाच .माझ्या अधिरतेने म्हण किव्वा दुसर्या कुटल्या कारणाने म्हण इतका प्रवास माझ्या अधीर मनाने होणे शक्य नाही .
नाही तरी हा "प्रिय " तुझा कुठे आहे . तो तर माझा आहे फक्थ माझा . तुलाही मी प्रिय वाटलो पाहिजे हा काही आग्रह नाही ( अपेक्षा मात्र आहे ) . पत्रास कारण कि , ...... खरच काही कारण असावे का असे पत्र लिहावयास ? तसे म्हटले तर कारण एकाच तुझ्या बद्दल काय वाटते याला वाट करून देणे , मनातच साठवून ठेवलं तर आठवण बनून त्रास होऊ लागतो त्यांचा ...
ज्या वेळी तुला पाहिले तेव्हापासूनच तुला जाणून घायची इच्छा मनी बळावत गेली।त्या क्षणा पासूनच हृदय तुला स्वाधीन केलेय , एव्हाना तुला याची कल्पना आली असेलच .तू समोर असताना तुझ्याकडे एकटक पाहण्याशिवाय दुसरा पर्याय माझ्याकडे उरतच नाही , हा एकटक माझ्या कडे पाहणारा वेडा कोण? असा प्रश्न नक्कीच तुला पडला असणार .... नाही का?
तुझ्या मनात काय आहे हे मला माहित नाही , तुझ्या आ यु श्या त कोणी आहे कि नाही याचा मला थांग पत्ता ही नाही, पण तू मला आवडतेस यात दुमत नाही .
पत्र थोडं लांबलय , काय करू पहिलाच प्रयत्न होता . काय लिहू नि काय नको हेच समाजात नव्हते , पुढेही पत्र लिहायची आहेतच की ( फक्थ तुला हि पत्रे मिळणार नाहीत याची काळजी घेत लिहिणार आहे )...
पुन्हा भेटूच .....
तुझाच ,