वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
लहानपणापासूनच गणरायाला माझ्या जीवनात एक वेगळे स्थान आहे...
जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्याने मला साथ दिलीये असे वाटते, काही वेळा मला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी मी इतक्या सहजगत्या करू शकलो याचे सारे श्रेय त्यालाच जाते..
माझ्या अडीअडचणीच्या वेळी त्यानेच मला मदत केलीये सावर्लेय आणि सुखांच्या वेळीही स्वतःचा विसर पडू दिलेला नाही...
या वर्षी गणपती दर्शनासाठी गावी जाणे झाले तिथे आलेला अनुभव तुम्हालाही सांगावासा वाटला म्हुनुनच ही धडपड... :-) :-) :-)
सुट्टीमध्ये गावी जाणे हे दरवेळी ठरलेले पण या वेळीचा कोकणातला आणि गणेशोत्सवाचा अनुभव काही औरच ...(एक आगळा वेगळा भक्ती भावाने भरलेला मंगलमय सोहळा )
या १० दिवसात एका वेगळाच विश्वात आल्यासारखे वाटत होते बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला असला तरी एक वेगळंच विश्व माझ्यावर सुखाचा पाऊस पाडत होते.
प्रवासाला सुरुवात झाली तीच मुळी देव जणू परीक्षा घेतोय ... ६-७ तासांत आपल्या Destination ला पोहोचणारी गाडी तब्बल १२ तास उशिरा पोहोचली.गाडीत असताना काही लोकांनी गावी जाण्याचा विचार सोडला आणि माघारी फिरले पण विग्न्हर्त्याचे दर्शन झाल्याशिवाय मी मागे फिरणे शक्यच नव्हते. उशिरा पोहोचल्याचा सारा थकवा ती मरगळ भालच्न्द्राला पाहून कुठल्या कुठे पळू गेली. लंबोदराची सुंदर देखनीय मूर्ती इतकी रेखीव होती कि मी थोडा वेळ माझे भान हरपून त्याकडे एकटक पाहताच राहिलो.आजीच्या "जेवून घे आधी " या वाक्याने मी भानावर आलो... सुखकर्त्यास वंदन करून मी पेट पुजेस बसलो पण डोळांसमोर ती मूर्ती अजून तरळत होतीच.

गावी असताना दिनक्रम ठरलेला सकाळी उठलो कि निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ व्यतीत करण्यासाठी आणि त्याचे खरे सौदर्य अनुभवण्यासाठी एकटाच चालत फिरत राहायचो , निरनिराळ्या पक्षांचे आवाज, मधेच येणारी ती वाऱ्याची झुळूक (सर्वांग मोहरून टाकणारी) आणि सृष्टीचे ते गोजिरवाणे रूप मनाचा असे काही ठाव घायचे की दिवसभर असेच हुंदडत राहावे असे वाटायचे.
सांजवेळ झाली कि सर्व आबाल थोर मंडळी आरती आणि भजनासाठी एकत्र जमत आणि प्रतेक्याच्या घरी जात.गावात घरे मोजकीच पण एकमेकांपासून थोडी दूरच. मग रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात हातात दिवा गळ्यात "टाळ" घेऊन एकामागून एक सगळेच रांगेत चालत राहू.पाय वाटेवरून एकंच माणूस चालू शकेल इतकी जागा आणि आजू बाजूला कमरेपर्यंत वाढलेली भात शेती , पाऊस अधून मधून हजेरी लावतच असायचा त्यातच रातकिडे आणि बेडूक आपण सर्वत्र पसरल्याची पावती देत असायचे.
मधूनच खळखळनाऱ्या झऱ्याचा आवाज ,त्यात पाय भिजल्यावर पायांनाच नव्हे तर मनाला मिळणारी प्रसन्नता अनुभवल्याशिवाय कळणार नाही.
पाच एक वर्षांपूर्वी जी गोष्ट( "भजन " ) मी टाळत असे त्या गोष्टीत मला इतकी रुची कशी वाटू लागली हे एक न उलगडलेले कोडेच आहे. "भजन " एक भक्तिरूप सोहळा... त्या गाण्यात इतका अर्थ दडलेला असेल याचा यावेळी मला प्रत्यय आला. "टाळ ", "तबला" आणि "पेटी" इतक्या माफक वाद्यांच्या तालावर सर्व भजन मंडळी (माझ्या सकट )बेभान होऊन गात राहू.(इतक्या माफक गोष्टींतून इतके सुंदर श्रवणीय संगीत निर्माण होईल याचा मी विचारही केला नव्हता ) "टाळांच्या" एकमेकांवर आदळण्याने जो ध्वनी (कंप ) निर्माण व्हायचा तो मनाला स्पर्शून जायचा आणि त्यामुळे मनाला एक प्रकारची प्रसन्नता मिळायची.(याच भजनातून माझा आवाज किती बेसूर आहे याचा प्रत्यय आला पण 'देव भाव बघतो सूर नाही' असे मनाला समजावून बेभान होऊन गातच राहिलो. :-p)
जसा भजनात गुंग झालेलो तसाच "त्या" तिघींच्या हसण्यातही.त्यांच्या निरागस हसण्यातून मनाला मिळणारे नवच्य्येतन्य , त्या सुंदर लेखाची आणि तो लेख लिहिणाऱ्या व्यक्तीची येणारी आठवण ... सारे सारेच किती रम्य आणि प्रसन्न... त्यांचे ते प्रसन्न हास्य टिपण्यासाठी आणि त्या नेहमी माझ्या दृष्टी समोर असाव्यात या साठी मनाची नेहमी धडपड होत असायची. त्या तिघींचे ते बोलके डोळे ,त्यांना भरपूर काही सांगायचेय असे नाहेमीच वाटायचे आणि आताही वाटतेय, त्या ते सांगू शकल्या नाही आणि मीही विचारू शकलो नाही पण त्यांच्या त्या हसऱ्या डोळांतील दुखः त्यांनी न सांगताच समजले...
माणसांबद्दल बोलायचे झाले तर पु. ल. नी "अंतू बर्वा" चे वर्णन केल्या प्रमाणे कोकणातला माणूस हा फणसाप्रमाणे आहे पूर्ण पिकल्याशिवाय (वृद्ध झाल्याशिवाय ) त्याचा खरा गोडवा नाही समजायचा, मला त्यात थोडासा बदल करावासा वाटतो "कोकणातला माणूस फणसाप्रमाणेच आहे वरून जरी कठोर काटेरी असला तरी आतून रसाळ आणि मधुर नक्कीच आहे गरज आहे ती फक्त थोडे जवळून जाणून घ्यायची.( बरोबर आहे ना "यशवंत मोराजकर" lol ).
विसर्जनाचा सोहळाही तेवढ्याच उत्साहाने साजरा झाला पण विसर्जनानंतर काही करावेसे वाटतच नव्हते,कशातच मन लागत नव्हते सर्व उत्साह विसर्जनासोबतच बुडाल्यासारखा वाटत होता.भजनाच्या वेळी "तू गेल्यावर पूजावे कुणाला " असे एक गाणे होते त्यावेळी जरी त्याचा इतका विचार केला नसला तरी त्याचा खरा अर्थ विसर्जनानंतर लागत होता आणि एक प्रकारची पोकळी निर्माण झालीये असे राहून राहून वाटत होते.
सुट्टीचे दिवस कसे संपले ते कळलेच नाही... निघायच्या आदल्या दिवशी परत जायचे हा विचारच करवत नव्हता. घड्याळाच्या काट्यावर फिरणारे जीवन माझी वाट पाहत होते.घरातून निघालो खरा पण मन अजूनही तिथेच रेंगाळत होते. काही तरी हातातून निसटतेय असा भास होत होता.त्याच वेळी मनात पक्का विचार केला पुढच्या वर्षी पुन्हा यायचे आणि वेडे मन पुढच्या वर्षीच्या
गजाननाच्या आगमनासाठी तयारही झाले ...
Note:
("त्या तिघी" बहिणी आहेत गावाला आमच्या घराच्या बाजूला राहणाऱ्या आणि शाळेत जाणाऱ्या , लोकांचा उगीचच गैरसमज होतोय :-प )