Thursday, December 29, 2011

सारिका

सारिका (एक व्यक्तिचित्र...)



तिच्या गालावरची खळी
जणू गुलाबाची उमलू पाहणारी नाजूक कळी

तिच्या हाताचा तो नाजूक कोमल स्पर्श
अंगावर रोमांच फुलवणारा मोरपिसाचा अर्क

तिचे ते मनमुराद हसणे
जणू शरदाचे चांदणे

तिचे ते सुंदर लाजणे                          (  तिचे लाजणे जणू 
जणू लाजाळूचे स्वतात सामावणे          मोहरलेली स्पंदने )

तिचा तो गोड मधुर आवाज
जणू कोकिळेचा (सारिकाचा दुसरा अर्थ) आलाप

तिचे  ते  नाजूक  रेखीव  पाणीदार डोळे
जणू  निरागसता आणी निष्पाप मनाचे प्रतीक

तिचे ते दिलखुलास हसणे
जणू मनाला स्वप्नांच्या नगरीत नेणे

तिची प्रत्येक अदा मनाला वेड लावून जाते
मनाच्या  एका  कोपऱ्यात  प्रत्येक गोष्ट घर करून बसते.



Thursday, December 22, 2011

प्रेम आणि जोडीदार

प्रेम आणि जोडीदार ...  

आ यु ष्य च्या काही क्षणी आपल्याला कोणीतरी आवडत फार आवडत. तिचा सहवास हवाहवासा वाटतो. तिचेच विचार मनात येत राहतात (दिवस रात्र )
हळू हळू आपले मनही तिच्यात गुंतत जाते मग हीच भावना बळावते आणि तिच्याशीवाय जगणे अशक्य प्राय आहे असे विचार मनात डोकाऊ लागतात.

सारे सारे नैसर्गिक.... कोणीतरी   आवडणे,  आपण तिच्या  प्रेमात पडणे आणि पुढचे सगळेच ....
यात आपला दोष नसतोच तर तो तारुण्याचा आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा प्रताप असतो

त्या वयात कोणीतरी आवडणे , तिचे  आचार विचार , तिची  style , तिची निरागसता, साधेपणा , तिचे हसणे, रागावणे, लाजणे, केवळ तिचे असणे हि आपल्याला वेंड लावून जाते आणि आपण एक वेगळ्या भाव विश्वात रममाण होतो....या साऱ्याची व्यवस्था निसर्गाने आधीपासूनच  करून ठेवलेली असते... आपण फक्त एका प्याद्या सारखे ते सारे FOLLOW करत असतो पण तिच्या शीवाय जगणेच शक्य नाही हा पूर्णपणे आपल्या मनाचा खेळ असतो ( पण "ती" आपल्या आयुष्यआत  आली तर जीवन अधिक सुखकर आणि आनंदमय नक्कीच होते)

पहिल्यांदा असे घडताना ही Feeling येणे स्वाभाविक आहे ,  त्या काळात प्रेम करायची भावना निर्माण झालेली असते, आपले मन स्वप्नाळू आणि अपरिपक्व असते काळ फार कमी असतो ... पण जस जसे आपण  स्वप्नातून सत्यात यायला लागतो तेव्हा स्वप्नातले निर्णय  चुकीचे वाटू लागतात मन दुखी होऊ लागते त्याची फरफट होऊ लागते .... स्वप्ने तुटल्यावर सारेच स्पष्ट होते

अश्या मनाला काबूत कसे आणवे त्याची कशी समजूत घालावी असे अनेक विचार आणि प्रश्न मनी येतात आणि इथेच मन परिपक्व व्हायला सुरवात होते असे आपण म्हणू शकतो rather  मला वाटते  (प्रत्येकाच्या बाबतीत असे घडते असे नाही ... काहींना लवकर अक्कल  येते काही त्यातून बाहेरच येत नाहीत  आणि माझ्या सारखे काही पुन्हा प्रेमात पडतात :-p)

तारुण्याच्या भरात पटकन आवडून गेलेल्या  व्यक्तीला  आ यु ष्य ची जोडीदार करण्याची घाई मुळीच करायला  नको
तिच्या  सवयी ,  स्वभाव , समजुद्दारपणा तिचे आपल्यावर असलेले प्रेम या गोष्टी खूपच Important  असतात
तिच्या सवयी खूप मोठा आणि important  भाग आहेत , त्या सवयी मुळेच आपण एकमेकांबरोबर कसे राहू हे समजते. जर सवयी MATCH होणाऱ्या असतील तर well n Good , पण जर त्यात खूप तफावत असेल तर मात्र प्रोब्लेम्स होतात. तेव्हा तिचा स्वभाव आणि समजुद्दारपणा कामी येतो.

जीवनाचा साथीदार निवडताना.आवडून गेलेल्या  प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आपण समजतो तसाच असेल याची काही शाश्वती नसते (आपण आपल्या मनाला तसे समजावत असतो) , ती समजुद्दार आहे की नाही , तिचा स्वभाव कसा आहे ते आपल्याला तिच्या सहवासात (तिच्याशी वेगवेगळ्या गोष्टीबद्दल बोलल्यावर , तिचे विचार जाणून घेतल्यावर, तिची आवड नावड समजून घेतल्यावर , तिच्या अपेक्षा , इच्छा आपल्या बनवण्यावर ......जर तिची आणि आपली स्वप्ने मिळतीजुळती असतील तर तो एक + point असतो,  म्हणूनच  मला वाटते की एक चांगली मैत्रीनच चांगली  सहचारणी बनू शकते :-) ) राहिल्यावरच कळणार. ( नेमकी चूक इथेच होते माणसे प्रेम करून बसतात आणि आपल्या जोडीदार असाच आहे असे तर्क लावून बसतात, काही काळ सुखाचा जातो पण जेव्हा एकमेकांना समजून घेण्याची  वेळ येते तेव्हा Problems  होऊ लागतात आणि सगळेच मोडकळीस येते)

प्रेम हे  त्या नात्याची सुरुवात आहे , त्या व्यक्तीचा स्वभाव,सवयी त्या ही पेक्षा महत्वाच्या  आहेत , त्या वर भरपूर काही अवलंबून असते आणि  समजुद्दारपणाशिवाय त्या नात्यालाच अर्थ नाही.(त्याला नात्याचा पाया म्हणता येईल )

ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता तिच्या आठवणी आपल्या ह्रृदयात जपुन ठेवा. तुमच्या कृतीतुन तिला तुमच्या प्रेमाची जाणीव करुन द्या. तुम्हाला कदाचीत कळणारही नाही.. but the other person will feel it when you do kind things to show your care. Love is the most unselfish emotion we should posess!!.


एकदा कुठेतरी वाचनात आले होते .. “Your parents will always love you more then you will love them and you in turn will love your children more then they will love you. the reason being that deep love emanates from knowledge”
लेखक म्हणतो.. “डोळे बंद करा आणी कोणत्याही १० गोष्टींचा विचार करा. तुम्हाला डोळ्यासमोर ज्या ज्या १० वस्तु, व्यक्ती दिसतील त्यावर तुम्ही मनापासुन प्रेम करता.” (मला तर १० पैकी ५ वेळा तीच दिसते :-p)
तुम्हाला प्रेम अनुभवायचे असेल, तर आधी प्रेम करायला शिका, दुसऱ्याला द्यायला शिका. Giving IS LOVE.

मग बघाल न प्रेम करून ???

पाहताक्षणी एखादी व्यक्ति आवडणं हे " आकर्षण" असतं ,

परत पहावसं वाटणं हा " मोह " असतो ,

त्या व्यक्तिच्या जवळून जाण्याची इच्छा असणं ही ..." ओढ " असते ,

त्या व्यक्तिला जवळून जाणणं हा " अनुभव "असतो आणी त्या व्यक्तिला तिच्या गुणदोषांसह

स्विकारणं हेच खरं " प्रेम " असतं ..!!!





 ( Note: Block Letters  मधल्या ओळी  पुस्तकातल्या  आहेत )


 

Monday, December 19, 2011

शिकवण

आजही  त्याने ते केलेच ... गोष्ठ छोटीशीच...  अगदीच  लहान पण प्रत्येक वेळी मनाला सुखावून जाणारी ...
माझ्याबाब्तीतल्या इतक्या लहान लहान गोष्टी तो लक्षात ठेवतो आणि न विसरता शुभेछा पाठवतो.

कॉलेज मध्ये खेळात गोल्ड मेडल मिळाले
ऑफिस  मध्ये १ वर्ष पूर्ण  झाले
माझे प्रमोशन  झाले
सुट्टी एन्जोय करायला सांगून आल्यावर तेथील अनुभव विचारणे
माझी तब्बेत ठीक नसताना मी कशी आहे ते विचारायला call करणे.
काही नवीन केल्यास त्याबद्दल शाबासकी देऊन अजून encourage करणे
माझ्या बर्थडे ला न चुकता call करणे
विचारले नसतानाही योग्य सल्ले देणे  ( :-p :-p :-p )

अशा एक न अनेक ज्या कधी कधी मलाच लक्षात नसलेल्या लहान गोष्टी तो माझ्या  लक्षात आणून देतो. मीही त्या गोष्टी बद्दल मग थोडा विचार करू लागते.
खरच काय मिळत असेल त्याला हे करून , काही मिळण्या साठी  का तो हे करत असेल? , फक्त   माझ्या साठीच करत असेल की सगळ्यांसाठी?.

reply  केला नाही तरी त्या बद्दल एक शब्द न उच्चारता राग न आणता पुन्हा मला लहान सहान  गोष्टींची आठवण  करून  देतो.
का कुणास ठावूक तो दिवस इतका imp नसला तरी आजकाल त्याच्या शुभेच्छांमुळे त्या दिवसाला एक वेगळेच रूप प्राप्त होते.

आयुष्य तील प्रत्येक लहान गोष्टीत मोठा आनंद लपला आहे तोच आनंद  मला अनुभवायला तर तो सुचवत नसेल ना.

धकाधकीच्या जीवनात खूपच कमी गोष्टी लक्षात राहतात, कधी विचार केलाय की प्रथम  ती गोष्ट करताना आपण किती आनंदी होतो ते?, त्या वेळी किती चांगले विचार मनात तरळले होते ते? , तो क्षण आपण कसा अनुभवला होता ते?.  त्या वेळी जे काही केलेले आणि अनुभवलेले ते आता आटवले जरी तरी आपण त्या विश्वात रमून जातो, एक दोन घटका का होईनात आपण तो आनंद पुन्हा अनुभवतो. आनंद अनुभवण्यात कोणी मागे का म्हणून राहावे?

न राहवून मी त्याला विचारलेच...
म्हणतो की माझ्या आजोबांनी ३ गोष्टी सांगितलेल्या त्याच Follow करण्याचा प्रयत्न करतोय... :-)

१. "सुख एकट्याने खाऊ नकोस सर्वांना वाट आणि दुख एकट्याला खाऊ देऊ नकोस."

२. दुस्रांच्या सुखात स्वताचे सुख मानायला शिक, दुस्रांना त्यांच्या आन्दाच्या क्षणी शुभेचा दे तो क्षण त्याच्या साठी एक आठवण बनवण्याचा प्रयत्न कर.
कुणी तुझ्या साठी असे करेल याची मात्र अपेक्षा ठेऊ नकोस आपले काम करत रहा.
( का करत असेल हा ? त्याच्या मनात काय आहे?  असे अनेक प्रश्न त्यांना पडतील ........
 कुणी चांगुलपणा दाखवला तर आपल्याला त्याचा संशय जास्त  येतो हे वास्तव आहे (मीही त्याला अपवाद नाही :-p ) )
आपण दुसऱ्यासाठी काही चांगले करतोय ही प्रोसेस enjoy कर तुलाच किती मस्त वाटेल ते बघ.( ही ओळ पुस्तकातली आहे)

३. लोकांच्या मनात झाक , त्यांना काय हवे आहे ते ओळखायला शिक , वेळ लागेल त्यासाठी पण प्रयत्न केलेस तर काहीच अवघड नाही. काही लोक उलगडतील काही नाही पण प्रयत्न थांबवू  नकोस.
 प्रयत्न  केलास याचेच समाधान मान.
दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याकडे काय 'बेस्ट' आहे ते आपण ओळखायचं. आणि आपल्याकडे असलेल्या त्या 'बेस्ट' गोष्टीची कोणाला गरज आहे ते शोधत राहायचं !

त्याचे विचार ऐकून मनातल्या शंका पण दूर झाल्या आणि जीवन जगण्यासाठी एक नवी दिशाही  सापडली.


वरील तीन गोष्टी समजण्यासाठी खाली त्याचे Brief  Explanation.
कोणी लिहिलंय ते माहीत नाही पण छोट्याश्या Paragraph मध्ये खूप मोठा  अर्थ  सांगून गेलय...

Extending simple human kindness to other people can make a huge difference in their lives and in yours. Everyone on Earth is carrying some sort of burden. You can't make their pain, stress, or grief just magically disappear but you can make others feel just a little bit lighter and happier on their journey, even if only for five seconds. When you make friendliness a habit, you'll attract kindness and smiles in return, and you'll feel great about yourself for making a positive difference in the world!


Note:  वरील स्टोरी काल्पनिक आहे.

Sunday, November 27, 2011

राहूनच गेले...

 NOTE: ही कविता पूर्णपणे  माझी नाही,  काही ओळी कुठेतरी वाचल्याचे मला आठवते त्यात थोडे माझे शब्द (Block font मधले ) टाकून पाहतोय...


एखाद्यावर जीवापाड प्रेम करावे पण ते ओठांवर  न यावे
तशी कारणे ही  असतात त्या मागे
तिच्या मनात काय  आहे? ( हे तर समजण्यापलीकडे आहे  :-p)
तिला कोणी दुसरा आवडतो का ?
मैत्रीत फुट तर पडणार नाही ना?
या आणि अशा अनेक चिंता सतावू लागतात...
आणि काही गोष्टी मनातच राहून जातात...


अशाच मनात राहिलेल्या काही भावनांबद्दल...
                                           
                                                             राहूनच गेले...

सांगायचे होते तुला खूप काही
राहूनच गेले सगळे काही
मनातले गुपित ओठांवर कधी आलेच नाही...

तुझ्या सहवासात असताना
तुलाच हृदयात साठवताना


तुझ्या सहवासात नसताना
तुझ्याच आठवणीत रमताना


तुला हसताना पाहताना
तुझ्याच हास्यात सर्वकाही विसरताना


तू  डोळ्य्नसमोर असताना
तुझ्याच  डोळ्यात स्वतःला  हरवताना


राहूनच गेले या आयुश्यात जगायचे तुझ्यासोबत
 भविष्याची  स्वप्ने मनी विणताना 


तू रागावशील , सोडून जाशील
मैत्रीचा धागा तोडून जाशील

अशा शंका, कुशंका, भास मनात येऊन गेले
त्यामुळेच की काय
माझे जीवापाड प्रेम व्यक्त  करायचे राहूनच गेले...

Friday, November 25, 2011

कुणीतरी असावे...

                                                   कुणीतरी असावे...


कुणीतरी असावे...
हसता हसता डोळ्यात पाणी आणि
रडता रडता ओठांवर हसू फुलवणारे...

कुणीतरी असावे...
काळजीपोटी रागावणारे,वाट पाहणारे, रुसणारे
आपल्यावर मनापासून प्रेम करणारे...

कुणीतरी असावे...
मनातले न सांगता समजून घेणारे
वेळ प्रसंगी हृदयात सामावून घेणारे...

कुणीतरी असावे...
सारे जग जरी विरुद्ध झाले तरी
आपल्याबाजूने खंबीरपणे उभे राहणारे...

कुणीतरी असावे...
जीवन जगतोय याची खात्री देणारे
आणि नसताना स्वतःचीच उणीव भासवणारे...

कुणीतरी असावे...
स्वतःची जाणीव करून देणारे
आयुष्यभर आपली  साथ देणारे...

कुणीतरी असावे...
स्वतःवर  प्रेम करायला भाग पाडणारे...
भूतलावर  स्वर्गीय अनुभव मिळवून देणारे...

खरच कुणीतरी असावे... आपल्याला खरच आपल म्हणणारे... 

Monday, November 7, 2011

कधीतरी वाटते...

                                                 कधीतरी वाटते...


कधीतरी वाटते...
"ती"च्या समोर जाऊन फक्त उभे राहावे
मी आल्याचे तिला वर न पाहताच कळावे
शब्द नाही बोलू शकले ते, केवळ माझ्या सहवासाने व्यक्त व्हावे...


कधीतरी वाटते...
"ती"च्या बोलक्या डोळ्यात एकदाच प्रेमाने पहावे
"ती"च्या साठीच्या प्रेमाशिवाय "ति"ला त्यात काहीच न दिसावे
शब्द नाही बोलू शकले ते, नज्रेच्या त्या एका कटाक्षाने व्यक्त व्हावे...


कधीतरी वाटते...
कारण नसताना  "ती"चा हात हातात घेऊन पाहावा
आयुष्यभर विनाकारण हात धरण्याची ती रंगीत तालीम असावी
 शब्द नाही बोलू शकले ते, केवळ त्या हाताच्या स्पर्शाने व्यक्त व्हावे...

कधीतरी वाटते...
"ती"ला एकदाच घट्ट मिठीत घ्यावे
त्या आलीन्ग्नाने "ती"लाही मोहरून यावे
शब्द नाही बोलू शकले, ते हृदयातील स्पन्दनानी व्यक्त व्हावे...


कधीतरी वाटते...
"ती"ने नकळतच माझ्या खांद्यावर डोके ठेवावे
माझेही  हाथ आपसूकच तिच्या केसात गुंतावे
शब्द नाही बोलू शकले, ते ह्या नकळत होणाऱ्या कृतीतून व्यक्त व्हावे...

Tuesday, October 25, 2011

कोण आहेस तू ???

काय सांगू  कोण आहेस माझ्यासाठी  तू ...

माझ्या मनाला हवा असलेला सहवास तू ...
माझ्या उदास कळीला फुलवणारा सुहास तू ...
माझ्या प्रत्येक श्वासात निजणारा वास तू...
माझ्या जीवनाला वळण देणारी वाट तू ...
माझ्या हृदयात प्रेमाने तुंब भरलेल्या नदीचा काठ तू ...
माझ्या डोळ्यांतल्या आसवांचा आधार तू ...
माझ्या ओठांवर हसू फुलवणारा प्रेमळ श्वास तू ...
माझ्या मनात तरळणारे संगीत तू ...
मला स्वताशीच  मिळवून देणारा एक स्वप्नवत ध्यास  तू ...
माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू ...


Friday, October 21, 2011

आयुष्य सुंदर आहे, जगणे शिकले पाहिजे !!!



आजचा अनुभव वेगळाच!!!
 थोडा विचार करायला लावणारा आणि खूप काही शिकवून गेलेला...

आज पूजाच्या आग्रहाखातर जत्रेला जायचा  योग आला( मनातून तसे जायचे नव्हतेच, शुक्रवारची संध्याकाळ पुढच्या २ दिवसांचे  प्लान्स आखायचे कि राहतो त्याच्या उलट दिशेला जाऊन काही वेगळे करावे हा एक दिव्य  प्रश्नच...) तर आम्ही हा ना करतच निघालो .

ज्या ठिकाणी जत्रा होती तेथे पोहोचलो,लहानपणी जत्रेमेध्ये सहभागी व्हायचो त्याची आठवण ताजी  झाली आणि सारे काही Flashback सारखे आठवू लागले (नाही म्हतले तरी ७-८ वर्षे झाली जत्रेला जाऊन विविध पाळण्यात बसून... ते ओरडणे ते हसणे आणि बरेच काही कुठे तरी हरवून गेले होते )

पहिल्या पाळण्यात बसलो, त्याचे एक वैशित्ये होते , तो कोणत्या क्षणाला कोणत्या दिशेला वळेल याचा काही नेम नाव्ह्था ते आम्हाला त्यात बसल्यावरच  कळले  ( आपल्या आयुश्याचेही  असेच नाही का ?  पुढच्या क्षणाला काय होईल कोणाला ठावूक म्हणूनच ते जगायला हवे आणि त्यातली अन्शितता अनुभवायला हवी, त्यातच खरी मजा नाही का?) तर आम्ही सर्वच वेड्यासारखे म्हणा  किव्वा लहान मुलासारखे म्हणा ओरडत होतो हसत  होतो, कोणी आम्हाला बघ्तेये आहाला बघून हस्तेये याचा थोडा ही विचार मनाला शिवला नाही फक्थ त्या गोष्टीची मजा अनुभवण्यात आम्ही बुडून गेलो होतो. पाळणा जेव्हा थांबला तेव्हा वेगळेच चयतन्य अंगात शिरल्या सारखे झाले होते.( या नजीकच्या  वर्षात मी कधी इतका हसल्याचा  ओरडल्याचा योगच आला नव्हता असे वाटत होते , त्या ओरड्ण्यातून जो काही राग, इर्षा आणि मनात जे जे काही वाईट होते ते सारेच निघून गेल्या सारखे वाटत होते आणि मन थोडे हलके झाल्याचा साक्ष्त्कार होत होता (इथे थोडी अतिशययोक्तीच झाली :-p पण चालते कधी तरी :-p) 

त्यानंतर योग आला तो आकाश पाळण्यात (Giant wheel ) बसण्याचा , त्यात बसण्याचा प्रत्येक वेळचा अनुभव वेगळाच पण पाळणा खाली येताना पोटात भीतीयुक्त  गोळा येतो तो क्षणच अवर्णनीय, त्या एका  क्षणात  भीतीही वाटते आणि तो पोटात येणारा गोळाही हवा हवासा वाटतो. आकाशात गेल्यावर आजूबाजूला गोल गोल  फिरणारे जग दिसू लागते सर्वच किती रम्य असते जणू आपण आकाशालाच  हात लावतोय असा भास होऊ लागतो, पाळण्याचा, इतरांच्या ओरडण्याचा आवाजही नाहीसा होतो मनात वेगळेच विचार तरळू लागतात आणि वेडे मन फुलपाखरासारखे बागडू लागते त्यातच वेळ संपलेली असते आणि मी जमिनीवर आलेला असतो.

महागाई वाढलीये त्याची झळ तेथेही लागली , पाळण्यात बसण्याआधी इतके पैसे? असे नाकही मुरडले पण पाळण्यातून उतरल्यावर जे अनुभवले ते त्या कवडीमोल रुपयांपेक्षा कितीतरी पटींनी "मोलाचे" होते. तो आनंद, मनाला वाटेल तसे ( लहान मुलाला शोभेल असे) वागणे , बागडणे या पुढे सारे काही गौणच...

हा अनुभव तुम्हाला सांगण्याचा उद्देश एकच की इतक्या लहान लहान गोष्टीत इतका मोठा आनंद सामावलेला असतो याचा आपल्याला धकाधकीच्या दुनियेत विसर पडलेला असतो. देव अधे मध्ये त्याचे प्रात्यक्षिक घडवून आपल्याला सिग्नल देत असतो पण आपणच त्या लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्यातला मोठा आनंद गमावून बसतो. काहींना तर आनंद अनुभवायचे पण आहेत पण त्यात करण्या साठी त्यांचे हात मात्र साथ देत नाहीत मला त्यांना सांगावेसे वाटते एकदा आपल्या मनात आलेय मग ते नक्की करून पहा पैशाची चिंता बिलकुल करू नका  कारण त्यातून मिळणारा आनंद हा त्या पैशातून मिळणाऱ्या एशोआरामापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे, ते अनुभवल्या शिवाय कळणार नाही.

(काही लहान गोष्टी ज्या मोठा आनंद देऊन जातात जीवनात )

समुद्र किनारी गेलात कपडांची पर्वा न करता भिजा पाण्यात, खेळा वाळूमध्ये , बनवा आपल्या स्वप्नांचे घर कोण आडवतय तुम्हाला ??? 

पाऊस पडतोय, जा भिजायला त्या साठी कसला मूड लागतोय ( तसे छत्री ब्यागेत ठेऊन मुसळधार पावसात भिजण्याची मजा काही औरच...)

आकाशात मस्त चांदणे पडलंय, जा गच्चीवर न्हाहून घ्या स्वताला त्या चांदण्यात, पैसे का लागतात त्यासाठी?

छान फुले फुलली आहेत त्यांचा सुगंध घायला कितीसा वेळ लागतो ??? 

आंघोळीच्या वेळी घ्यावे नाचून , गाऊन कोण मरायला येतेय तुम्हाला अडवायला.

सूर्योदय सूर्यास्त पाहण्यापासून कोणी अडव्लेय का तुम्हाला, करा व्यतीत  थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात बघा थोडे त्याच्याशी बोलून.

भेट घ्या  मित्रांची जा  फिरायला त्यांच्याबरोबर हसा, खेळा बघा कसा वेळ निघून जातो ते किती आनंद मिळतो ते...

तर मग बघा हे सर्व करून ( वेळ मिळालाच तर  :-p) स्वताच्या आनंदासाठी थोडा वेळ काढणे तरी जमेल असे वाटते. काय मग शोधणार न छोट्या गोष्टीतला  मोठा आनंद... आणि जमलेच तर मला हि सांगा वरील गोष्टी व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या लहान गोष्टीत  मोठा आनंद शोधला ते...

"स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
विश्वास उडाला कि आशा संपते ,
काळजी घेणं सोडलं कि प्रेम संपतं..
म्हणून स्वप्नं पहा , विश्वास ठेवा आणि काळजी घ्या , आयुष्य खूप सुंदर आहे"

टीप : वरील ज्या लहान लहान गोष्टी आहेत त्या पूर्णपणे माझ्या नाहीत.( काही माझ्या वाचनात आलेल्या आहेत )
पुस्तकांचे आणि इतर वाचन जास्त प्रमाणात झाल्यामुळे डोक्यात थोडी उल्थापालात झाली आहे त्यामुळे  असे वेगळे विचार मनात येऊन आनंद शोधण्याचा प्रयत्न होतोय.

Saturday, October 1, 2011

एक अविस्मरणीय अनुभव...



वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

लहानपणापासूनच  गणरायाला  माझ्या जीवनात एक वेगळे स्थान आहे...
जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्याने मला साथ दिलीये असे वाटते, काही वेळा मला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी मी इतक्या सहजगत्या करू शकलो याचे सारे श्रेय त्यालाच जाते..
माझ्या अडीअडचणीच्या वेळी  त्यानेच  मला मदत केलीये सावर्लेय  आणि सुखांच्या वेळीही स्वतःचा विसर पडू दिलेला नाही...
या वर्षी गणपती दर्शनासाठी गावी जाणे झाले तिथे आलेला अनुभव तुम्हालाही सांगावासा वाटला म्हुनुनच ही धडपड... :-) :-) :-)


सुट्टीमध्ये गावी जाणे हे दरवेळी ठरलेले पण या वेळीचा कोकणातला आणि गणेशोत्सवाचा अनुभव काही औरच ...(एक आगळा वेगळा भक्ती भावाने भरलेला मंगलमय सोहळा )
या १० दिवसात एका वेगळाच विश्वात आल्यासारखे वाटत होते बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला असला तरी एक वेगळंच विश्व माझ्यावर सुखाचा पाऊस पाडत  होते.

प्रवासाला सुरुवात झाली तीच मुळी देव जणू परीक्षा घेतोय  ... ६-७  तासांत आपल्या Destination ला पोहोचणारी गाडी तब्बल १२ तास उशिरा पोहोचली.गाडीत असताना काही लोकांनी गावी जाण्याचा विचार सोडला आणि माघारी फिरले पण विग्न्हर्त्याचे  दर्शन झाल्याशिवाय मी मागे फिरणे शक्यच  नव्हते. उशिरा पोहोचल्याचा सारा थकवा ती मरगळ भालच्न्द्राला पाहून कुठल्या कुठे पळू गेली. लंबोदराची सुंदर देखनीय मूर्ती इतकी रेखीव होती कि मी थोडा वेळ माझे भान हरपून त्याकडे एकटक पाहताच राहिलो.आजीच्या "जेवून घे आधी " या वाक्याने मी भानावर आलो... सुखकर्त्यास वंदन करून मी पेट पुजेस बसलो पण डोळांसमोर ती मूर्ती अजून तरळत होतीच.




गावी असताना दिनक्रम ठरलेला सकाळी उठलो कि निसर्गाच्या सान्निध्यात  थोडा वेळ  व्यतीत  करण्यासाठी आणि त्याचे खरे सौदर्य अनुभवण्यासाठी एकटाच चालत फिरत राहायचो , निरनिराळ्या पक्षांचे  आवाज, मधेच येणारी  ती वाऱ्याची  झुळूक (सर्वांग  मोहरून टाकणारी) आणि  सृष्टीचे ते गोजिरवाणे रूप  मनाचा असे काही ठाव घायचे की दिवसभर असेच हुंदडत राहावे असे वाटायचे. 
सांजवेळ झाली कि सर्व आबाल थोर मंडळी आरती आणि भजनासाठी एकत्र जमत आणि प्रतेक्याच्या घरी जात.गावात घरे  मोजकीच पण एकमेकांपासून थोडी दूरच. मग रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात हातात दिवा गळ्यात "टाळ" घेऊन एकामागून एक सगळेच रांगेत चालत राहू.पाय वाटेवरून एकंच माणूस चालू शकेल इतकी जागा आणि आजू बाजूला कमरेपर्यंत वाढलेली भात शेती , पाऊस अधून मधून हजेरी लावतच असायचा त्यातच रातकिडे आणि बेडूक आपण सर्वत्र पसरल्याची पावती देत असायचे.
मधूनच खळखळनाऱ्या झऱ्याचा आवाज ,त्यात पाय भिजल्यावर पायांनाच नव्हे तर मनाला मिळणारी प्रसन्नता अनुभवल्याशिवाय कळणार नाही.

पाच एक वर्षांपूर्वी जी गोष्ट( "भजन " ) मी टाळत असे त्या गोष्टीत मला इतकी रुची कशी वाटू लागली हे एक न उलगडलेले कोडेच आहे. "भजन " एक भक्तिरूप  सोहळा... त्या गाण्यात इतका अर्थ दडलेला असेल याचा यावेळी मला प्रत्यय  आला. "टाळ ", "तबला" आणि "पेटी" इतक्या माफक वाद्यांच्या तालावर सर्व भजन मंडळी (माझ्या सकट )बेभान होऊन गात राहू.(इतक्या माफक गोष्टींतून इतके सुंदर श्रवणीय संगीत निर्माण होईल याचा मी विचारही केला नव्हता ) "टाळांच्या" एकमेकांवर आदळण्याने जो ध्वनी (कंप ) निर्माण व्हायचा तो मनाला स्पर्शून जायचा आणि त्यामुळे मनाला एक प्रकारची प्रसन्नता मिळायची.(याच भजनातून माझा आवाज किती बेसूर आहे याचा प्रत्यय  आला पण 'देव भाव बघतो सूर नाही' असे मनाला समजावून बेभान होऊन गातच राहिलो. :-p)

जसा भजनात गुंग झालेलो तसाच "त्या" तिघींच्या हसण्यातही.त्यांच्या निरागस हसण्यातून मनाला मिळणारे नवच्य्येतन्य   , त्या सुंदर लेखाची आणि तो लेख लिहिणाऱ्या व्यक्तीची येणारी आठवण ... सारे सारेच किती रम्य  आणि प्रसन्न... त्यांचे ते  प्रसन्न हास्य टिपण्यासाठी आणि त्या नेहमी माझ्या दृष्टी समोर असाव्यात या साठी मनाची नेहमी धडपड होत असायची. त्या तिघींचे ते बोलके डोळे ,त्यांना भरपूर काही सांगायचेय असे नाहेमीच वाटायचे आणि आताही वाटतेय, त्या ते सांगू शकल्या नाही आणि मीही विचारू शकलो नाही पण त्यांच्या त्या हसऱ्या डोळांतील दुखः त्यांनी न सांगताच समजले...

माणसांबद्दल बोलायचे झाले तर पु. ल. नी "अंतू  बर्वा" चे वर्णन केल्या प्रमाणे कोकणातला माणूस हा फणसाप्रमाणे आहे पूर्ण पिकल्याशिवाय (वृद्ध झाल्याशिवाय ) त्याचा खरा गोडवा नाही समजायचा, मला त्यात थोडासा बदल करावासा वाटतो "कोकणातला माणूस फणसाप्रमाणेच आहे वरून जरी कठोर काटेरी असला तरी आतून रसाळ आणि मधुर नक्कीच आहे गरज आहे ती फक्त थोडे जवळून जाणून घ्यायची.( बरोबर आहे ना "यशवंत मोराजकर"  lol ).

विसर्जनाचा सोहळाही तेवढ्याच उत्साहाने साजरा झाला पण विसर्जनानंतर काही करावेसे वाटतच नव्हते,कशातच मन लागत नव्हते सर्व उत्साह विसर्जनासोबतच बुडाल्यासारखा वाटत होता.भजनाच्या वेळी "तू गेल्यावर पूजावे कुणाला " असे एक गाणे होते त्यावेळी जरी त्याचा इतका विचार केला नसला तरी त्याचा खरा अर्थ विसर्जनानंतर लागत होता आणि एक प्रकारची पोकळी निर्माण झालीये असे राहून राहून वाटत होते.

सुट्टीचे दिवस कसे संपले ते कळलेच नाही... निघायच्या आदल्या दिवशी परत जायचे हा विचारच करवत नव्हता. घड्याळाच्या काट्यावर फिरणारे जीवन माझी वाट पाहत होते.घरातून निघालो खरा पण मन अजूनही तिथेच रेंगाळत होते. काही तरी हातातून निसटतेय  असा भास होत होता.त्याच वेळी मनात पक्का विचार केला पुढच्या वर्षी पुन्हा यायचे आणि वेडे मन पुढच्या वर्षीच्या गजाननाच्या आगमनासाठी तयारही झाले ...

Note:
("त्या तिघी" बहिणी आहेत गावाला आमच्या घराच्या बाजूला राहणाऱ्या  आणि शाळेत जाणाऱ्या , लोकांचा उगीचच गैरसमज होतोय :-प )

Thursday, September 29, 2011

मन हे वेडे.....

                                                         वेडे मन...


मन,   कधी वाटे दवबिंदूप्रमाणे  कधी विशाल सागराप्रमाणे...
मन,   कधी वाटे खोल दरीप्रमाणे  कधी उंच आभाळाप्रमाणे...
मन,   कधी वाटे कर्कश ध्वनिप्रमाणे  कधी भयाण शान्ततेप्रमाणे...
मन,   कधी वाटे लख्खे प्रकाश्म्ये  कधी  कुट्ट अंधाराप्रमाणे...

मन हे वेडे,    कधी उडे पक्षांच्या थव्याप्रमाणे...
                     कधी उदास होई चिमुकल्या बाळा प्रमाणे...


मन हे वेडे,   कधी केवळ जिवलगांच्या आठवणीनि प्रसन्न होई...
                    कधी सर्व समवेत असतानाही उदास होई...


मन हे वेडे,   कधी काही न कळताच सर्व उमग्ल्याचा आव आणी...
                    कधी सर्व काही कळूनही न कळल्यागत वागी... 


मन हे वेडे,   एका क्षणी सर्व काही गमावल्याने दुखी होई...
                   दुसरयचं क्षणी काहीतरी कामावल्याच्या विचाराने सुखी होई...


मन हे वेडे,   "ती" असताना तिच्याशीच बोलायला घाबरे...
                   "ती" नसताना खोटी हिम्मत आणून तासंतास गप्पा मारे...

Wednesday, August 31, 2011

"ती"

This one... for some one special !!!
The girl I care for...
The girl I pray for...
The girl who inspires me...
The girl who mean more than just a friend to me...


                                                  "ती"

ती, काय  सांगावे तिच्याबद्दल
शब्द अपुरे पडावे,तिचे सौंदर्ये काय वदावे...

हसताना गालावर पडणारी खळी जशी खुलून दिसावी
त्यप्रमाणे तिही हसताना इतरांमध्ये उठून दिसावी...

तिला बघून हसणे हाच एक पर्याय उरावा
तिला हसताना पाहणे हाच विरंगुळा ठरावा...

सर्व हसण्यावारी नेऊन स्वताही हसत राहते
हीच अदा मला तिच्याकडे आकर्षित करते...

तिच्या हसण्यात आहे एक प्रकारची जादू
तिला हसताना पाहताना मनावर राहत नाही काबू...

तिच्या नकळतच खूप काही बोलून, करून जाते
वेडे मन उगीचच त्यात न दडलेला अर्थ शोधू पाहते...

योग्य काय अयोग्य काय याची तिला काळजी नसे 
पण का कुणास ठाऊक सर्व निर्णय योग्य घेणे तिला नेहेमीच जमते.....

जसे गुंतावे धागे एकमेकांत 
मनही गुंतत गेले तिच्या स्पंदनात...




इथे POEM संपवतोय कारण पुढील  ओळीं मधून  तिला नक्कीच कळले असते की मी तिच्या विषयी बोलतोय आणि मला तेच नकोय... :-) 

Friday, August 19, 2011

I Can't Say "YES"


One of my friend told me to write a poem... about what she feels ohhh sorry what she "Think"
To write a poem from a girls perspective and that to without feelings :-( , it is too difficult for me and i thought only girl can help me out.
'Anjali' thanks a lot for your help, to frame this poem rather to write this poem. :-) thanks thanks a ton ...
I think "A poem without feeling is like body without soul..."
I tried my level best, not to put any "Feelings" in it but still... its a poem...


                                                        I Can't Say "YES"


I know…
U’l give me everything I ask for
U understand me n also adore

Its difficult for me…
To see pain in your eyes
and to say no more lies

Nothing said would be less,
But… I can't say YES…

I can see…
the love, the trust, the faith
the longing,  but all in vain..

I knew…
Wen I’m with you
I’l be the happiest few..

Nothing said would be less,
But… I can't say YES…

I know...
Our future will be bright
There won't be a frightening sight

I need...
Much more time for consideration  
To overcome the interventions 

Nothing said would be less,

But… I can't say YES… at least NOW... 

Wednesday, August 17, 2011

खरच... ह्यालाच का प्रेम म्हणत असावेत...

                                      ह्यालाच का प्रेम म्हणत असावेत...

तिने काही बोलू नये मिही काही बोलू नये 
तरीही एकमेकांच्या  मनातले  कळावे...
 ह्यालाच का प्रेम म्हणत असावेत...

तिचा तो नाजूक कोमल स्पर्श हातालाच नव्हे 
तर हृदयालाही स्पर्शून जावा आणि मन तृप्त होऊन जावे...
 ह्यालाच का प्रेम म्हणत असावेत...

ती हसताना चेहरयावर हसू  खुलावे  
ती रडताना नकळतच डोळ्यातून अश्रू  यावेत...
 ह्यालाच का प्रेम म्हणत असावेत...

खूप काही बोलायचे, सांगायचे या वेळी... असे ठरवावे
तिला पाहिल्यावर "HI" म्हनन्यापलीकडे तोंडातून शब्दही बाहेर न पडावेत...
 ह्यालाच का प्रेम म्हणत असावेत...

खूप दिवसांनी फोन करून तासनतास बोलावे
आणि सगळे विषय संपल्यासारखे मधेच गप्प होऊन बसावे...
 ह्यालाच का प्रेम म्हणत असावेत

ती बरोबर असताना तिला पाहताच रहावे 
तिने पहिले कि उगीचेच हसून नजर वळवावी...
 ह्यालाच का प्रेम म्हणत असावेत...

ती न दिसल्यावर मन व्याकूळ व्हावे
तिला शोधायला सैरावैरा धावत सुटावे...
 ह्यालाच का प्रेम म्हणत असावेत...

खरच...  ह्यालाच का प्रेम म्हणत असावेत...



Saturday, August 6, 2011

मैत्रीण...

                                                          मैत्री...  

मैत्रीची परिभाषा तिनेच शिकवली 
अपेक्षांचे ओझे त्यामुळेच कमी झाले...

मित्रांबरोबर आपलेपणाने वागणे, हक्काने रागावणे 
सारेकाही तिच्यामुळेच शिकलो...

चुकांमुळे होणारे ते रुसवे फुगवे 
त्यातूनच धरलेला तो अबोला 
त्यातही येणारी एक मजा 
एकमेकांबद्दल वाढणारा जिव्हाळा 
सारे तिनेच शिकविले...

मनात फुलात चाललेल्या भावनेसारखी
मैत्री बहरत गेली नवीन पालविसारखी...

तिच्या मनातले मला, माझ्या मनातले तिला 
हे कळण्याला एकच भाव असतो असे नाही 
निखळ मैत्रीतही असे होते 
खरे मित्र सापडल्या शिवाये त्याचा प्रत्यय येणे नाही...

तुझ्या मैत्रीला उपमा द्यावी कशी 
अमृताला असे गोडी जशी 
मित्रत्वाला पूर्ण करते जशी मैत्री 
मला पूर्णत्व देते तुझीच  मैत्री...

Friday, August 5, 2011

नकळतच मनात यावे.....

                                                 

नकळतच मनात यावे , "ती"नेही मला चोरून पहावे...

चोरून पाहण्यातच एकमेकांची नजर भिडावी 
भिडलेली नजरच मनातले भाव वदावी...

"ति"चे ते सुंदर हसणे मनाच्या कोपरयाला स्पर्शून जाते 
राग लोभ सर्वेकाही त्या हस्ण्यातच विरून जाते...

"ति"ला एकदा पाहण्यासाठी  मन सैरा वैरा पळते 
"ती" नसताना मन उगीचच उदास होऊ पाहते...

"ती" असताना जग कसे सुंदर भासते 
"ती" नसताना स्वताचीच जणू उणीव भासते...

"ति"ला वेळी अवेळी पाहण्याची आस मनात दाटते
तो क्षण येण्याची मन आतुरतेने वाट पाहते...

Saturday, July 30, 2011

बायको कशी असावी (How A Wife Should Be)

                                                        बायको कशी असावी...

 बायको कशी असावी, सुंदर नसली तरी चालेल 
 पण चार चौघात उठून दिसणारी असावी ...

 बायको कशी असावी, समजुद्दार नसली तरी चालेल 
 पण माझ्या भावना समजून घेणारी असावी...

 बायको कशी असावी, प्रेमळ नसली तरी चालेल 
 पण माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी असावी ...

 बायको कशी असावी, हुशार नसली तरी चालेल 
 पण सर्व  गोष्टी हुशारीने हाताळणारी मात्र असावी ...

 बायको कशी असावी, धैर्येवान नसली तरी चालेल 
 पण दुःखाच्या क्षणी मला सावरणारी असावी ...

 बायको कशी असावी, गमतीदार नसली तरी चालेल 
 पण माझ्यासारखी खोडकर नक्की असावी ...

 बायको कशी असावी, हसताना गालावर खळ्या  पडल्या नाहीत  तरी चालेल  
 पण तिच्या हसण्यातून दुस्रांच्या  दुखांवर फुंकर मारणारी आणि हसू फुलवणारी मात्र असावी...

कशीही  असुदे पण बायकोपेक्षा  एक मैत्रीण म्हणून जास्त असावी...

                                                       it’s all how wanted her to be... :-) 

 i  was just wondering how SHE would be , sorry  to bore you but had to post this!!!!!

जर कोणाला ही  कविता वाचून मला वेडे म्हणावेसे  वाटत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्ने  आहे ... :-p :-p :-p 

Saturday, May 14, 2011

Mazi Pahili Marathi Kavita

Started writing this blog almost 6 months ago… from the first day I was searching “how to write Marathi in this blog” (wanted to post 2-3 Marathi poems in it).

So I tried downloading many Marathi typing software’s, I downloaded  also but not worth… so I borrowed AKRUTI Marathi typing software and wrote whole poem in it… but while pasting….. No use .

So I stopped… but few days back while posting new content I found Marathi typing setting in that post only… how stupid I was…

Now I can write Marathi poems , so here’s the first one which is my favorite..
About a girl… (Maybe she will come in my life (Yet to come, my dream girl) and understand what I feel)

                                                कधी कळतील...

कधी कळतील तिला माझ्या मनातल्या भावना.
कधी कळतील चंद्राला या तारयांची  साधना.

माझ्या हृदयातील चुलबुल तिला कशी समजली नाही.
या डोळ्यांचे इशारे तिला कसे गवसले नाही.

तिला पाहताच मी झालो होतो तिचा.
तेव्हा पासून चढली  मला एक वेगळीच नशा.

तिचे बोलणे तिचे हसणे काय  सांगू .
मनातच म्हटले  मी तिच्या शिवाय  कसा राहू.

बघता बघता मी तिच्या प्रेमात दुब्लो.
मित्रांमध्ये असतानापण तिच्या आठवणीत  बुडलो. 

तरीही तिला माझ्या मनाची धडपड समजली नाही. 
या कोवळ्या जीवाची आस कळली नाही.



The poem is fictitious any resemblance is just a co-incidence.

Monday, April 4, 2011

NEW YEAR.....NEW RESOLUTIONS....


New year resolutions are most common things in my life, as every year I make a resolution but after few days …. (U all know) I don’t even know what was the resolution. :-p :-p :-p …. 

This poem is for all of them who at least THINK of  It (RESOLUTION….)



In this New year, like everyone...                                
I took resolution, like every year…

On this New month, whatever I do…                                                                        
Should be worth, I believe so…
                                                                                                            
On this New fortnight, looking for a New sight…                                                      
Trying to forget all my frights…

On this New week, wana acquire success peak…                                        
Wana walk on New path, give everything which comes across…

On this New day, while finding a new way...                                    
Rays from brightening sun, encouraging me to run…

On this New morning, bad habits burning…                                               
Cocks crowning, New thoughts frowning…

On this New hour, I think for an hour…                                               
Nothing but wana use it more and more…

New thoughts gathering…                                                                   
Inviting a change...                                                        
Awareing a fact, the thoughts are new But my habits are old...

I wana ask……
Will they survive???

Saturday, January 29, 2011

My First Poem...

My   first  poem , it’s all about me… ;-) :-) ;-) what I feel, what I suppose to do… my dreams… and more importantly how I am actually behaving since last few years or so…


WOKE UP AS I NEVER BEFORE

AS I HAVE GROWN UP AND THOUGHT ABOUT MY PAST….
I REALISE I HAVE NEVER DONE ANYTHING…
TO DO WHAT I NEVER DID…..
I WOKE UP AS I HAD NEVER BEFORE….

WHEN I READ, HEAR SOMEONE'S ACHIVEMENTS, GREAT DEEDS…
SOMETHING PUSHES ME FORWARD TO DO SO …
AND I WOKE UP AS I HAD NEVER BEFORE….

IN THE JOURNEY OF MY LIFE…
DID I COME TO KNOW I HAVE TO DO MUCH MORE TO FULFILL MY DREAMS….
AND I WOKE UP AS I HAD NEVER BEFORE….

I THINK ABOUT REACHING NEW HEIGHTS…
TO BE ON TOP OF THE WORLD, TO LIVE THE WAY I NEVER LIVED,
BE CONSCIOUS OF ALL MY RIGHTS...
AND I WOKE UP AS I HAD NEVER BEFORE….

THE AWAKENING PROCESS IS CONTINUING SINCE LAST FEW YEARS….
WHENEVER I FEEL SOMETHING EXTRAORDINARY, ACHIEVING ….
I STRAIGHT AWAY GO FOR IT, AS I HAVENT BEFORE…
BUT NOW I REALLY WANT 2 WAKE UP….
NOT BECAUSE I DIDN’T DO ANYTHING, BUT FOR MY INNER PEACE….
WHICH I THINK WILL GET WHEN I ACTUALLY WAKE UP FROM MY DREAMS…